सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी महा ई-सेवा केंद्राचा आधार
सरकारी कागदपत्रे जमा करणे हे बऱ्याच वेळेला किचकट काम मानले जाते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असते. नागरिकांना ही कागदपत्रे सुलभतेने मिळावीत, या उद्देशाने ई–सेवा केंद्र सुरू करण्यात आले. आतापर्यंत ७,००० नागरिकांनी ई–सेवा केंद्राच्या सेवांचा लाभ घेतला आहे.